नमस्कार, पंचवीस वर्षापूर्वी केसरी टुर्स सोबत केलेल्या एका प्रवासाचे टिपण जाणीवपूर्वक जसेच्या तसे आज कोणताही फोटो न वापरता पोस्ट करीत आहे. तुम्हाला आवडले तर जरूर प्रतिक्रिया नमूद करा! गोष्ट आहे सन २००० च्या वर्षातली! नेहमी प्रमाणे कौटुंबिक सहलीची आखणी झालेली होती. हया सुट्टीचा कार्यक्रम काहीसा मोठा होता! मुंबईहून ओरिसा राज्यातील भूवनेश्वर,जगन्नाथपूरी, कोणार्क सूर्य मंदिर पाहून पश्चिम बंगाल मधील कलकत्ता-दार्जिलिंग मार्गे जायचं ठरलं होतं- एकमेव हिंदू राष्ट्राच्या भेटीसाठी - अर्थातच कांचनजंगेच्या कुशीतील-नेपाळ!