उंच आकाशाकडे नजर करताच कायम बर्फाच्छादित राहिल्यामुळे पार बोडक्या दिसणार्या कातीव कडेकपारी, त्यांच्या अंगाखांदयांवर झुलणारे हिम! आणि त्यांच्या पायाशी लडिवाळ नाद करीत प्रवाही झालेले झरे आणि मग त्यांच्या कुशीमध्ये जागोजाग पसरलेले हिरवळीचे गालिचे!
रम्य सरोवरांच्या प्रदेशात – भाग ३
आम्ही हिरव्यागार हरित तृणांच्या मखमालीने नटून थटून आमच्या स्वागतास सज्ज असलेल्या नागमोडी वळणे असलेल्या डोंगर उतारांवरुन पुढे चालू लागलो. जसजसे पुढे जात होत होतो तसतसे उंचीचे माप वाढत होते. मागे वळून पाहता विस्तीर्ण खोऱ्यात सोनामर्ग गाव आणि ताजिवास ग्लेशियर दिसत होते. त्याच्या पलीकडे दूर एकमेकांत पाय गुंतवून उभे असलेले ‘बलतल’ जवळचे पहाड दिसत होते. आणि त्याही पलीकडे ‘बर्फानी बाबा’ अमरनाथ पहाडाच्या गुंफेत हया वर्षी यात्रेकरूंच्या कोलाहलाविना ध्यानस्थ बसले असावेत!
रम्य सरोवरांच्या प्रदेशात – भाग २
सर्व दूर पसरलेली पाचूच्या रंगाची कुरणे, देवदार वृक्षांची जंगले आणि चंदेरी हिमाने नटलेली पर्वत शिखरे!
रातराणी
रात राणी फुलली, कळी कळी फुलली
शब्द
भावना व्यक्त होताना लेखणीतून शब्द जन्म घेतात. जणू मनाची स्पंदनं! जसं व्यक्त व्हाल तसा भाव! तर हे एक शब्द काव्य!
ध्यास
संघर्षाशिवाय ध्येय पूर्ती नाही! जीवनात लक्ष्य ही फार महत्वपूर्ण गोष्ट आहे. ध्यास हा हवाच!
मन माझे
आपल्या मनाचा ठाव आपल्यालाच कधी लागत नाही. कधी असं तर कधी तसं ! मानवी मनाची गती अनाकलनीय! "मन माझे" ह्या कवितेत माझं मन फुलपाखरू अलगद चिमटीत पकडण्याचा हा एक प्रयत्न!